कृपाळू सज्जन तुम्ही संतजन - अभंग
संत तुकाराम महाराज
संत तुकाराम महाराज हे १७व्या शतकातील मराठी कवी आणि हिंदू संत होते, जे महाराष्ट्रात तुका, तुकोबाराया, तुकोबा म्हणून प्रसिद्ध आहेत. ते वारकरी (वारकरी) संप्रदायाचे संत होते जे विठोबाची पूजा करतात. ते समतावादी, वैयक्तिक वारकरी भक्तीपरंपरेचा भाग होते. तेंव्हा त्यांनी त्यांच्या वारकरी साम्रदयातील लोकांना अभंगां द्वारे पंढरपुरला जाणार्या वारकर्यांना हा महत्वाचा निरोप दिला.
कृपाळू सज्जन तुम्ही संतजन।
एवढे कृपादान तुमचे मज॥१॥
आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा।
कींव माझी सांगा काकुळती॥२॥
अनाथ अपराधी पतित आगळा।
परी पायांवेगळा नका करू॥३॥
तुका म्हणे तुम्ही निरविल्यावरी।
मग मज हरि उपेक्षिना ॥४॥
आता असों हे बहुत | देवीं धर्मीं ज्यांचे चित्त |
भजे कामनारहित | तो सत्वगुण ||
ऐसा हा सत्वगुण सात्विक | संसारसागरीं तारक |
येणें उपजे विवेक | ज्ञानमार्गाचा ||
सत्वगुणें भगवद्भक्ती | सत्वगुणें ज्ञानप्राप्ती |
सत्वगुणें सायोज्यमुक्ती | पाविजेते ||
ऐसी सत्वगुणाची स्थिती | स्वल्प बोलिलें येथामती |
सावध होऊन श्रोतीं | पुढे अवधान द्यावें ||
दासबोधातील दुसऱ्या दशकातील सातव्या समासात सत्वगुणाबाबत समर्थांनी विस्ताराने मार्गदर्शन केले आहे. एकूण 88 ओव्या आहेत, तरीही शेवटी समर्थ म्हणतात, स्वल्प बोलिलें येथामती | काय बोलावे....किती ही विनम्रता!
शेवटच्या तीन ओव्यांमध्ये त्यांनी पूर्ण समासाचा सारांश सांगितला आहे.
देवाची आणि धर्माची आवड ज्याला मनापासून आवड आहे, ज्याचे चित्त देव व धर्मात मनापासून रमते तो सत्वगुणी!
जो कुठलीही इच्छा न ठेवता, निष्काम भावाने भगवंताची भक्ती करतो तो खरा सत्वगुणी!
सत्वगुणाने युक्त असणाऱ्या सात्विक व्यक्ती या सत्वगुणामुळे संसारसागरातून तरुन जातात. आणि त्याने ज्ञानमार्गातील आत्मज्ञानविवेक उत्पन्न होतो.
या सत्वगुणामुळे भगवंताची भक्ती घडते, सत्वगुणामुळे ज्ञानप्राप्ती होते, एवढेच नव्हे, तर सत्वगुणामुळे सायुज्यमुक्तीची ही प्राप्ती होते.सायुज्य मुक्ती म्हणजेच भगवंताशी अद्वैत निर्माण होणे! भक्त देवात एकरुप होऊन जाणे...
सत्वगुण अभ्यासताना रजोगुण व तमोगुणाबाबतही जाणून घेणे आवश्यक आहे.रज, तम, सत्व असे तीन गुण आहेत. रजोगुणी व्यक्ती या मोहमयी मायाबाजारातच रमतात. वासना, धडपड, खटपट, उद्योगीपणा, लढाऊ वृत्ती हे रजोगुणासोबत येतात.
आळस, निद्रा, जडत्व, मोह हे तमोगुणासोबत येतात. प्रकाश, ज्ञान, शांती, समाधान, नि:स्वार्थी प्रेम हे सत्वगुणांसोबत येतात. प्रत्येक व्यक्ती या त्रिगुणांनी युक्त असतो. मग ज्या व्यक्तीत ज्या गुणाचे प्राबल्य अधिक तशी ती व्यक्ती मानली जाते. थोडक्यात याचे वर्णन करायचे असल्यास सत्वगुण हा सर्वोत्तम समजला जातो, कारण सत्वगुणामुळे भगव़ंताविषयी प्रेम, भक्ती निर्माण होते.
रजोगुणातील संसारातील आसक्ती या गुणामुळे पुन्हा पुन्हा जन्म घेऊन यावे लागते.
तमोगुणामुळे माणूस पुढच्या जन्मी खालच्या योनीत जन्म घेतो.या पूर्ण लेखात माझ्या बुद्धीचा वापर करुन एकही अक्षर मी लिहिलेले नाही.किंवा विवेचन केलेले नाही, समर्थांनीच इतके विस्तृतपणे लिहिले आहे, तेच या लेखात मी उतरवले आहे.
आमचा लेख कसा वाटलं हे आम्हाला कंमेंट द्वारे नक्की कळवा
|| धन्यवाद ||
Post a Comment