तुका म्हणे - (अ.क्र. - ९३९)
(अ.क्र. - ९३९)
आशा हे समूळ खणोनि काढावी ।
तेव्हाचि गोसवी व्हावे तेणे ।।१।।
आशा मारुनिया जयवंत व्हावे ।
तेव्हाचि निघावे सर्वांतूनि ।।३।।
तुका म्हणे जरि योगाची तांतडी ।
आशेची बीबुडी करी आधी ।।४।।
अर्थ -
मनातील आशा समूळ खणून काढल्यानंतरच माणसाने संन्यासी व्हावे. ।।१।।
अन्यथा संसारातच सुखी रहावे. उगीचच स्वतःची फजिती करू नये. ।।२।।
मनातील इच्छा अपेक्षांना मारून जितेंद्रिय झाल्यानंतरच सर्वांमधून बाहेर पडावे. ।।३।।
तुकोबा म्हणतात, ज्याला योग साध्य करण्याची घाई झाली आहे त्याने अगोदर आशेला संपवून टाकले पाहाजे. ।।४।।
आमचा लेख कसा वाटलं हे आम्हाला कंमेंट द्वारे नक्की कळवा
|| धन्यवाद ||
Post a Comment