प्रस्तावना

 प्रस्तावना

भजन, गौळणंहरिपाठ, मराठी गानी, आरती, भक्ति गीत, भावगीत, पोवाडे, कृष्णा गौळण, प्रसायदान

महाराष्ट्र ही संतांची भूमि आहे. हयाच महाराष्ट्राची राजधानी मुंबई म्हणजेच धनलक्ष्मीची जननी. हयाच मुंबईची जीवनरेषा म्हणजे रेल्वे. इथे अनेक परराज्यांमधील अनेक खेड्या-पाड्यातील लोक नशिब अजमावण्यासाठी तसेच नोकरी-धंदयासाठी एवढ्या दूरवरुन आलेले आहेत. इथे लोक आपले जीवन घडाळाच्या काट्याप्रमाणे व्यतीत करत आहेत. नोकरी-धंदयाशिवाय इतर काही करावं तर एवढा वेळ आहे कुणाला? अशा लोकांना पैशाशिवाय धर्मांची किंवा संस्कृतीची आस्था आहेच कुठे? याला अपवाद आहे ते म्हणजे रोज रेल्वेने प्रवास करणारे प्रवासी. नोकरी-धंदयाच्या निमित्ताने रोज किमान एक ते दोन तास रेल्वेने प्रवास करता करता किती त्रास किंवा यातना होतात हे ह्या प्रवाशांनाच माहित.

प्रवासात नवनविन ओळखीही होतात आणि ह्यातूनच प्रवासात होणारा त्रास विसरण्यासाठी संस्कृतीची धर्माची जाणिव असणाऱ्या काही प्रवाशांनी यावर मात करुन हेच प्रवासाचे एक-दोन तास ईश्वर चिंतनात घालवायचे ठरवले आणि त्यातुनच मग रेल्वे डब्यांमधून भजनाचे स्वर निनादू लागले. ईश्वराचे नामस्मरण भजनाच्या सुरांमधून ऐकायला येऊ लागले. पण भजनाला पखवाज, टाळ, सूरपेटी हे साहित्य लागतेच ते रोजच्या गर्दीच्या प्रवासात घेऊन फिरणार कसे? यावरही उपाय हयाच भक्तांनी शोधला तो म्हणजे एक दोन छोटे चकवे आणि हातातून सहज घेऊन जाता येईल असे रिझम (कांगो) डफली या साधनांचा वापर करुन भजनाचा आस्वाद घेत आपला प्रवास आनंदमय करुन घ्यायला सुरवात झाली, यातुनच वेगवेगळी भजन मंडळ स्थापन झाली. त्यापैकीच आमचे हे “जय हनुमान खडकीची वाडी भजनी मंडळ " आमच्या मंडळाची स्थापना झाली तीच मुळात नवनवीन स्वप्न घेऊनच!

आमच्या मंडळाच्या प्रत्येक सभासदाना अंर्तमनातून खरोखरच अस वाटत की मुंबई ही आपली कर्मभुमी आहे याच कर्मभुमीत आपण समाजासाठी काहीतरी चांगल कार्य कराव. ईश्वर कृपेने जय हनुमान खडकीची वाडी भजनी मंडळच्या माध्यमातुन हे कार्य पुढे नेण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत

हे महामंडळ स्थापन करण्यात आमच्या जय हनुमान खडकीची वाडी भजनी मंडळचा मोलाचा वाटा आहे.

थोर साधु संतानी सर्व सामान्यांना दिलेली भजनरुपी संजीवनी समाजातील भजन प्रेमी पर्यंत पोचावी म्हणून आम्ही सर्व मंडळी स्पर्धारुपी भजनाचे कार्यक्रम घेऊन, सर्वांना एकत्र आणून समाजापर्यंत पोचवण्याचा प्रयत्न करत आहोत.

'इवलेसे रोप लावियेले द्वारी। त्याचा वेलु गेला गगनावरी।। या ज्ञानेश्वर माऊलींच्या अभंगाप्रमाणे या छोट्या-छोट्या रेल्वे प्रवासी भजन मंडळांनी आपल्या महाराष्ट्राच्या संस्कृतीचे रोपटे भजनाच्या माध्यमातून वाढविण्याचे कार्य भजन मंडळे सामाजिक बांधिलकी व संस्कृतीचे जतन करण्याचे कार्य सुरु केले. 

खूप जोमाने व मन:पुर्वक करत आहेत. पण संताचे हे अभंग गाताना किंवा सादर करण्यासाठी त्याला भागवत धर्माचा आधार हा पाहिजे. ह्याच कल्पनेने आमच्या सारख्या एका छोट्या “जय हनुमान खडकीची वाडी भजनी मंडळ (ठाणे)” यांनी "lyricgaani.blogspot.com हे अभंगाचे site प्रकाशित केले आहे. अभंग हे महाराष्ट्रातील महान संतांच्या 'श्री सकलसंत गाथा' यातून निवडून घेतले आहेत. जेणेकरुन सर्व सामान्य भाविक ईश्वराचे चिंतन भजनाच्या माध्यमातून करतील आणि आपल्या थोर संतांची महती सर्वांना ज्ञात होईल.

“ जय हनुमान खडकीची वाडी भजनी मंडळ" यांचे हे सुंदरभजनावली रुपी "इवलेसे रोप" प्रत्येकाने आपल्या संग्रही (ह्रदयात) ठेवावे हिच सदिच्छा!

कोकण सर्वांत जास्त भजन हा प्रकार चालतो ' भक्तीरसातुन जनमाणसा नंतर नतमस्तक म्हणजे भजन ' भजावा म्हणजे जपा आणि नमावा भाजप भजन होय . शलाच एक म्हणजे डबलबारी भजन प्रकार मधे भजना भिन्नच आध्यात्म समाज प्रबोधन आणि विनोदाचे चुटके सांगितले आणि भजन रसिकांच्या आधारे काही गाण्यांचे साधरीकरण केले जाते .कोणतेही भजनी बुवा बारचे प्रतिस्पर्धक तरी संपुष्टात आणायचे ते चांगले मित्रांचे आदर करतात

आम्हाला खात्री आहे की हा लेख  मनोरंजन भजनानंद रचून मंत्रमुग्ध कारणी भजने आणि खजीना आसणारी डबलबारी भजने आपल्याला आनंद होईल.

धन्यवाद !

।। जय जय रामकृष्ण हरी। जय जय रामकृष्ण हरी।।


No comments

Powered by Blogger.